READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944E

टेबल ऑफ़ कंटेंट्स

आध्यात्मिक धारणांची आवश्यकता

मराठी प्रीमियम

4

मिनिटे

आपल्या धारणा आपले निर्णय तसेच कार्यांना प्रभावित करीत असल्याने त्यांना यथाशक्य वास्तविक तसेच यथार्थ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


– व्रजनाथ दास 


धारणा असणे स्वाभाविक आहे. आपल्या धारणा दैनिक जीवनात योजना बनविण्यासाठी तसेच व्यवस्थापन करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावतात. त्या दिवसभर आपणास मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक गोष्टीबाबत निर्णय घेण्याबाबत सहाय्यता करतात. जसे – “कामासाठी घरातून लवकर निघाल्यास मला रहदारीचा त्रास होणार नाही.” ही देखील एक धारणा आहे. परंतु, आपणास जीवनातील मोठे निर्णय तसेच आध्यात्मिक जीवनातील उन्नतीबाबत आपल्या धारणांचा वारंवार अवलोकन करीत राहिले पाहिजे.


दैनिक जीवनातील आपल्या धारणा बर्‍याचदा तर्कांवर आधारित असतात; परंतु तरीही आपण त्यांच्याविना कोणतीही योजना बनवू शकत नाही. तर, मुद्दा हा नाही की धारणा असाव्यात की नसाव्यात, मुद्दा हा आहे की आपल्या धारणांची पडताळणी करण्याचे मापदंड कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्याद्वारा आपण निष्कर्षाप्रत पोहोचू शकतो.


आध्यात्मिक जीवनाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेताना आपल्या धारणांना समजले पाहिजे आणि नंतर योग्य व्यक्तीबरोबर चर्चा करून त्यांची पुष्टी करून घ्यावी. हे योग्य व्यक्ती आपले दीक्षा गुरू अथवा इतर कोणताही योग्य व्यक्ती असू शकतो. आपण विनम्र भावनेत जिज्ञासा करावी, नाहीतर त्यांचे उपदेश प्रभावशाली ठरणार नाहीत. म्हणून आपल्या धारणा जाणून वरिष्ठजनांसमोर त्यांना प्रस्तुत कराव्यात.


भगवद्गीतेत तीन लोकांच्या भिन्न-भिन्न धारणा होत्या आणि त्यांनी त्यानुसार कार्य केले. हे तीन लोक होते – धृतराष्ट्र, दुर्योधन आणि अर्जुन. चला, आपण या तिघांच्या धारणांचे अवलोकन करू, जेणेकरून आपल्या भक्तीमार्गातील धारणांना समजून त्यांचा सामना करण्यात मदत होईल.


भगवद्गीतेच्या आरंभी धृतराष्ट आपल्या पुत्रांच्या विजयाबाबत आशंकीत होता. तरीही त्याच्या मनात ही धारणा होती की इच्छामृत्यूचा वरदान प्राप्त असलेल्या भीष्म आणि अजेय द्रोणांच्या उपस्थितीमुळे पांडव त्याच्या पुत्रांना पराजित करू शकणार नाहीत.


धृतराष्ट्राचा पुत्र, दुर्योधन म्हणाला, “आपले बल असीमित आहेत” (अपर्याप्तं तदस्माकं, गीता 1.10). भीष्म आणि द्रोणांचे बळ पाहून दुर्योधन हे समजून बसला होता की युद्धांत कौरवांचा विजय निश्चित आहे. प्रत्येक व्यक्ती हीच धारणा करून बसला होता की या दोन योद्ध्यांना प्राप्त वरदानांमुळे त्यांचा वध कोणीच करू शकणार नाही, जोपर्यंत ते स्वत: मृत्यूचा स्वीकार करणार नाहीत. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी हे दोन्ही योद्धा काही बोलले नाहीत आणि दुर्योधन हे समजून बसला की हे दोघे देखील त्याच्या पापकृत्याचे समर्थन करीत आहेत. अशा प्रकारे दुर्योधनाला आपल्या विजयाबाबत पूर्ण विश्वास होता.


धृतराष्ट्राने संजयाच्या मुखातून भगवद्गीता तर ऐकली; मात्र दुर्योधनाप्रति अत्यधिक स्नेहामुळे त्याने आपल्या धारणांचे पुनरावलोकन केले नाही. त्याने श्रीकृष्णांचे हे शब्द ऐकले – “मी आधीच द्रोणाचार्य, भीष्म, जयद्रथ, कर्ण तसेच इतर महान योद्ध्यांचा वध केला आहे.” (गीता 11.34) आणि, त्याने संजयाकडून गीतेचा अंतिम निष्कर्ष देखील ऐकला होता – “जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे.”
 


दुर्योधनाच्या मनात आपली सेना नष्ट होण्याची आशंका होती. गीता 1.9 याचे प्रमाण आहे. दुर्योधन म्हणतो, “येथे एकत्रित झालेले सर्व योद्धा माझ्यासाठी प्राणांची आहुती देण्यासाठी तयार आहेत.” परंतु, पांडव तसेच श्रीकृष्णांप्रति द्वेषामुळे त्याने देखील आपल्या धारणांचे पुनरावलोकन केले नाही. त्यांच्या केवळ एका दोषाने सर्व समस्यांना जन्म दिला. त्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जमलेल्या सर्व योद्ध्यांच्या बळ तसेच त्यांच्या दुर्बळतेबाबत विचार केला, मात्र त्याने त्याच्या विनाशाचे प्रमुख कारण असलेल्या श्रीकृष्णांचा विचार केला नाही.


अर्जुनाची मानसिकता धृतराष्ट्र तसेच दुर्योधनाहून भिन्न होती. त्याची धारणा होती की आपल्या परिजन तसेच वरिष्ठजनांची हत्या केल्याने त्याला पाप लागेल आणि तो कौटुंबिक परंपरांना नष्ट करण्याचे कारण बनेल (गीता 1.36-43); परंतु नम्रभावात श्रीकृष्णांकडून उपदेश श्रवण केल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णांच्या शिकवणींचा स्वीकार केला आणि अंतत: युद्धात विजयी ठरला. अर्जुन म्हणाला, “हे कृष्ण! हे अच्युत! माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढनिश्चियी आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करणस सिद्ध आहे.” (गीता 18.73) मन:पूर्वक श्रीकृष्णांच्या शिकवणी ऐकल्याने अर्जुनाची धारणा बदलली आणि त्याचे विचार आणि संकल्प सुस्पष्ट झाले. 


धारणा आणि आपले चरित्र


धृतराष्ट्र, दुर्योधन तसेच अर्जुनाच्या धारणांचे विश्लेषण करून आपण समजू शकतो की यापैकी कोण भौतिक स्तरावर आहे आणि कोण आध्यात्मिक स्तरावर आहे. सर्व प्रजाजन पांडवांचे गुणगान करीत आणि म्हणून धृतराष्ट्र आणि दुर्योधन पांडवांचा द्वेष करीत. त्यांना आपला पराजय दिसत होता, तरी द्वेषामुळे त्यांच्या चित्तात विजयाची धारणा प्रबळ बनली होती. 


धृतराष्ट्र आणि दुर्योधनाने अन्यायपूर्वक पांडवांचे राज्य हडपले होते आणि त्यांना अगदी इंचभर जागा देखील द्यायची नव्हती. धृतराष्ट्र या धारणाने ग्रस्त होता की त्याला कोणत्याही प्रयत्नाविना सिंहासनावर बसायला मिळाले पाहिजे. हे तमोगुणाचे लक्षण आहे. 


दुर्योधन आपल्या पित्याहून थोडा वेगळा होता. तो पांडवांचे राज्य प्राप्त करण्यासाठी आपल्या प्राणांसहित कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार होता. राज्य जिंकण्यासाठी त्याने युद्ध केले आणि त्याच्या धारणांनी त्याला अंतत: विनाशाच्या चोखटीपर्यंत आणले. अशा प्रकारे दुर्योधनात रजोगुणी व्यक्तीची लक्षणे होती. 


अर्जुन युद्धाच्या परिणामांविषयी अत्यंत चिंतीत होता आणि लोक-कल्याणार्थ तो युद्धभूमी त्यागून वनात जाण्यासाठी तयार होता. समाज तसेच लोकांप्रति त्याची करुणा पाहून तो एक महान भक्त असल्याचे दिसून येते. श्रीमद्भागवत (6.10.9) सांगते, 


“इतरांचे दु:ख पाहून दु:खी आणि सुख पाहून सुखी होणार्‍या मनुष्याची धर्मतत्त्वे श्रेष्ठ मानली जातात. पुण्यवान आणि इतरांच्या हितासाठी तत्पर असणारे महान पुरुष अशा धर्मतत्त्वांचा अव्ययी म्हणून गौरव करतात.”


सत्त्वगुणी व्यक्ती अधिकतर असे निर्णय घेतो ज्यामुळे समाजाचे कल्याण होईल. सुरुवातील मनातील संभ्रम दूर करण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला आणि आपल्या धारणांना स्पष्ट केले. फलस्वरूप तो भौतिक स्तरावरून वर उठला आणि युद्ध लडून देखील कर्म आणि भौतिक बंधनांतून मुक्त राहिला. 


शिकवणींना जीवनात उतरविणे


कृष्णभक्तीच्या मार्गावर चालत असताना आपण अशा धारणा विकसित कराव्यात ज्या आपणास योग्य निर्णय घेण्यात सहाय्यता करू शकतील. आपल्याकडे प्रत्येक निर्णयासाठी वरिष्ठांचा सल्ला प्राप्त करण्याची संधी अथवा सुविधा नसते. म्हणून आपण भगवद्गीतेतील शिकवणींच्या आधारावर आपल्या धारणा बनविल्या पाहिजेत. सांसारिक वस्तू, व्यक्ती तसेच परिस्थितींविषयी धारणा बनविताना आपण भौतिक शक्ती तसेच तिचा आपल्यावरील प्रभाव नीटपणे समजून घेतला पाहिजे. या ज्ञानाच्या आधारावर आपण धारणा बनवू शकलो तर या धारणांपासून उत्पन्न होणार्‍या आपल्या अपेक्षा आणि त्याच्या फलस्वरूप आपल्या हातून होणारी कार्ये श्रीकृष्णांचे नियम तसेच त्यांच्या इच्छानुरूप पार पडतील. 


ज्या लोकांच्या धारणा विद्वजनांद्वारा अनुमोदित नसतील, ते अंतत: असफलच ठरतील. श्रील प्रभुपाद सांगत की, भक्तांनी स्वत:ची तर्कबुद्धी लावू नये. म्हणून गुरुपरंपरेतील प्रामाणिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या धारणांची पुष्टी करता आली पाहिजे.
 


भलेही आपल्या जीवनातील चढ-उतारांना थांबविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते अपरिहार्य आहेत. परंतु, या जगातील आपला संघर्ष तेव्हाच थांबू शकतो जेव्हा आपण गुरू, साधू तसेच शास्त्राच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत शुद्ध आध्यात्मिक चेतनेच स्थित असू. अर्जुन याचे जीवंत उदाहरण आहे. त्याची धारणा होती युद्धामुळे पाप आणि विनाश घडेल. परंतु, जेव्हा त्याने आपली धारणा परम गुरू, श्रीकृष्णांसमोर मांडली तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सत्याचा मार्ग दाखविला. श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत अर्जुनाने आपली चेतना तसेच कार्य, दोघांनाही परिशुद्ध केले.


सारांश असा, जीवनात अनेकदा आपणास उपलब्ध ज्ञानाच्या आधारावर धारणा बनवाव्या लागतात. ही गोष्ट आध्यात्मिक आणि भौतिक, दोन्ही प्रकारच्या निणर्यांवर लागू पडते. परंतु, आपल्या धारणा भगवद्गीतेतील श्रीकृष्णांच्या शिकवशी अनुरूप असाव्यात. शक्य तेव्हा आपल्या धारणांची पडताळजी गुरू, साधू तसेच शास्त्रांकडून करून घ्यावी. अशा प्रकारे तर्क न करता आपण सत्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.


श्रीकृष्णांमध्ये जितका अधिक विश्वास असेल तितके आपण पाहू शकू की आपल्या जीवनातील प्रत्येक घटना ही आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठीच रचण्यात आली आहे. खर्‍या मनाने श्रीकृष्णांच्या शिकवणींवर आधारित निर्णय घेतले तर श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त आपल्या जीवनरूपी नौकेचे नेतृत्व करून ही नौका भवसागरापार असलेल्या भगवद्धामात घेऊन जातील.


व्रजनाथ दास (पी.एच.डी.) आपली पत्नी सुवर्ण राधादेवी दासी (पी.एच.डी.) तसेच दोन मुलींसह कोलोरॅडो, अमेरिका येथे निवास करतात. ते पुस्तक वितरणाबरोबर इस्कॉन डेन्वहर येथील श्री श्री राधा-गोविंद विग्रहाची सेवा देखील करतात.

Spread the love

टेबल ऑफ़ कंटेंट्स

रिलेटेड आर्टिकल

Explore Other Articles

Scroll to Top