READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944E

टेबल ऑफ़ कंटेंट्स

सौभाग्याची अनुभूती

मराठी प्रीमियम

2

मिनिटे


मागील वर्षीची गोष्ट आहे. आमच्या वडलांचे लहानपणीचे एक मित्र वृद्धावस्थेत रोगग्रस्त झाल्याने अंथरुणाला खिळले. त्यांच्या मुलाने मला फोन करून त्यांच्या अंतिम अवस्थेची माहिती दिली आणि निवेदन केले की मी त्यांना भेटण्यास यावे. तेथे पोहोचल्यावर आढळले की त्यांचे शरीर जवळजवळ समाप्त झाले होते, केवळ अस्थी आणि प्राण बाकी होते. पूर्वी आम्ही जेव्हा कधी भेटत असू तेव्हा ते माझ्याशी अध्यात्माविषयी चर्चा करीत. परंतु, आज ते शांत होते. जीवनातील या अटळ स्थितीला पाहून मी देखील स्तब्ध झालो. तेव्हा अचानक त्यांच्यात हालचाल दिसली. ते बोलले – “मुला, आज जीवनातील सर्व लहान-मोठ्या गोष्टींचे महत्व समाप्त झाले आहे.”


या काही शब्दांतच त्यांनी संपूर्ण जीवनातील आपल्या अनुभवाचा सार सांगितला. किती सार्थक, किती योग्य आणि किती सदुपयोगी त्यांचे शब्द होते!


मी या जगाच्या स्वभावाविषयी विचार करू लागलो. क्षणभंगुरता. येथे आपण जीवनाला किती महत्व द्यावयास शिकविले जाते. मात्र, तद्नंतर सूचना मिळते – “तुम्हाला दुस्तर रोग झाला आहे.” तेव्हा संपूर्ण जगच पलटते.


ही अंतिम सूचना देण्याआधी आपण अगदी छोट्याशा गोष्टींना फार महत्व देतो – “तो मला असे म्हणाला…त्याने माझ्यावर आरोप केला…त्याने मला फसविले…त्याने माझ्याकडे रागाने पाहिले, इत्यादी.” परंतु, एकदा मृत्युशय्येवर पडल्यावर या सर्व गोष्टी निरर्थक ठरतात. ज्या गोष्टींसाठी आपण लढाई केली, ज्या लोकांना आपण शत्रू अथवा मित्र मानले, ज्या परिस्थितीतींना आपण अनुकूल-प्रतिकूल असल्याचे मानले…सर्वकाही व्यर्थ ठरते. क्षणभंगुर गोष्टींना गरजेपेक्षा अधिक महत्व देताना आपण शाश्वत गोष्टींकडे पूर्णपणे कानाडोळा करतो.


श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की, जो व्यक्ती मृत्युसमयी त्यांचे स्मरण करतो, तो नि:संदेह त्यांना प्राप्त करतो. परंतु, वडलांच्या मित्राची स्थिती पाहता हे सांगणे कठीण होते की त्यांची इंद्रिये, मन इत्यादी श्रीकृष्णांचे स्मरण करण्यासाठी सशक्त असतील. जरी त्यांनी आजीवन भगवद्गीतेचे पालन केले, सात्त्विक जीवन जगले आणि भक्तिमय साधना केली; परंतु आज ते अचेतावस्थेत असल्याने त्यांना कोणत्याही गोष्टीचे भान नाही. ते जर अशा अचेतावस्थेत शरीर सोडणार असतील तर त्यांना कोणती गती प्राप्त होईल?


भगवंत कोणी निष्ठुर न्यायाधीश, कंजूष व्यापारी अथवा मूर्ख निरीक्षक नाहीत. ते परम दयाळू, उदार तसेच एक प्रेमळ मित्र आहेत. अचेतावस्थेत शरीर त्यागल्यावर ते एका निष्ठुर न्यायाधीशाप्रमाणे न्याय देणार नाहीत – “हे पाहा, तू मृत्यूवेळी माझे स्मरण केले नाहीत! आता येथेच खितपत पडून राहा.” भलेही मरणासन्न भक्त अचेतावस्थेत श्रीकृष्णांचे स्मरण-कीर्तन करताना दिसत नसेल, त्या अवस्थेत तो आत्म्याच्या स्तरावर श्रीकृष्णांबरोबरच आहे आणि श्रीकृष्ण त्याच्याशी कसा व्यवहार करीत आहे, हे आपण समजू शकतो का?


श्रील प्रभुपाद ‘रसराज श्रीकृष्ण’ पुस्तकात लिहितात, “भगवंत आपल्याहून दूर नाहीत. ते आपल्याबरोबरच आहेत. ते असे मित्र आहेत जे सतत आपल्याबरोबर राहतात. ते वाट पहात आहेत की केव्हा आपण त्यांच्याकडे उन्मुख होऊ. ते इतके दयाळू आहेत की आपण त्यांना विसरलो तरी ते आपणास कधीच विसरत नाहीत.”


मला एक कथा आठवली. एक दारुडा व्यक्ती दररोज मंदिरात जात होता. परंतु, मंदिरात न जाता तो बाहेरूनच हात हालवित म्हणत असे, “हे गोविंद! मी ‘किशोर’ आलो आहे,” आणि निघून जात असे. अशी अनेक वर्षे निघून गेली. एके दिवशी तो रोगग्रस्त होऊन मृत्युशय्येवर पडला होता. त्याच्याकडे उठण्याची शक्ती नव्हती. अचानक त्याच्या दरवाजावर थाप मारल्याचा आवाज आला – “किशोर! मी ‘गोविंद’ आलो आहे.”


मी वराह पुराणातील त्या श्लोकाचे स्मरण करू लागलो जेथे भगवान वराहदेव भूमीदेवीसमोर घोषणा करतात – “हे संपूर्ण ब्रह्मांड माझे शरीर आहे. माझ्यावर जन्म-मृत्यूचा प्रभाव नाही आहे. जेव्हा व्यक्ती मलाच एकमेव आश्रय मानून शरण येतो, तेव्हा मृत्यूवेळी त्याचे शरीर अगदी लाकूड अथवा दगडाप्रमाणे अचेत असले आणि त्याच्या इंद्रियांवर त्याचे नियंत्रण नसले, तेव्हा अशा मरणासन्न अवस्थेत असलेल्या माझ्या भक्ताचे मी स्मरण करतो आणि धावत त्याच्याकडे जातो. नंतर मी त्याला माझ्या नित्य धामात घेऊन येतो, जेथे तो माझ्या नित्य, शाश्वत सेवेत संलग्न होतो. (वराह पुराण 114.64-65)


अटळ मृत्यूबरोबर मी श्रील प्रभुपादांच्या कृपेबाबत विचार करू लागलो, ज्यांनी न केवळ आम्हाला भक्तीची विधी दिली त्याबरोबर त्यांनी भक्त, मंदिरे, पुस्तके, श्रीविग्रहांची सेवा, उत्सव इत्यादींच्या माध्यमातून एक अशी भेट दिली जी न केवळ सुखद आहे तर ती आपली या जगातील अनादी काळापासून चालत आलेली यात्रा समाप्त करून आपणास भगवंतांप्रति शाश्वत सेवा प्रदान करू शकते. किती सौभाग्यशाली आहोत आपण!


– वंशी विहारी दास

Spread the love

टेबल ऑफ़ कंटेंट्स

रिलेटेड आर्टिकल

Explore Other Articles

Scroll to Top