READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944E

टेबल ऑफ़ कंटेंट्स

वास्तविक कृपा 

मराठी प्रीमियम

2

मिनिटे



– नागराज दास



मागील वर्षी सौभाग्यवश श्रीधाम वृंदावनात काही माहिने व्यतीत करण्याची संधी प्राप्त झाली. मी इस्कॉनच्या कृष्ण-बलराम मंदिराच्या जवळच एका खोलीत राहत होतो. त्या वास्तव्यातील एक स्मरणीय क्षण म्हणजे भगवंतांच्या आरतीवेळी दीप-आरतीनंतर भारतीय श्रद्धाळू कशा प्रकारे आरती घेण्यासाठी एकच गर्दी करतात. आपण सर्वजण जाणतो की भगवंतांच्या आरतीमध्ये त्यांना तुपाचा दिवा अर्पण केला जातो. भगवंतांना अर्पण केलेली प्रत्येक वस्तू त्यांचा प्रसाद (कृपा) बनत असल्याने दिपक अर्पण केल्यानंतर आरती पाहणार्‍या श्रद्धाळूंमध्ये फिरविला जातो आणि ते त्यावरून हात फिरवीत भगवंतांची कृपा प्राप्त करतात. तसेही कृष्ण-बलराम मंदिरात फारच गर्दी असते आणि आरतीदरम्यान एखादा दिपक घेऊन



श्रद्धाळूंमध्ये येतो तेव्हा आरती घेण्यासाठी लोकांमध्ये अगदी धक्का-बुक्की देखील होताना दिसते.



त्यांची उत्सुकता पाहून अनेकदा मी भगवंतांकडे प्रार्थना करतो की कदाचित् माझ्या अंत:करणात देखील भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्याइतकी उत्कंठा निर्माण होवो. परंतु, दुसरीकडे माझ्या मनात विचार यायचा, “या श्रद्धाळूंना असे काय हवे ज्यासाठी आरती प्राप्त करण्यासाठी ते इतके उतावीळ आहेत?”



श्रील प्रभुपाद नेहमी भारतीयांच्या मनातील धर्म आणि अध्यात्माप्रति असलेल्या निष्ठेचे स्तुती करीत. पण, ते हे देखील सांगत की अधिकांश भारतीय शुद्ध भक्तीभावनेने प्रेरीत नाहीत. त्यांना केवळ पुण्य प्राप्त करायचे आहे, ज्याद्वारे ते पुढील जन्मी सुखी राहू शकतील. या दृष्टीकोणातून पाहिले असता समजते की कृष्ण-बलराम मंदिरात आरतीचा दिवा प्राप्त करण्यासाठी गर्दी करणारे लोक श्रीकृष्णांप्रति शुद्ध प्रेम किंवा भक्तीने प्रेरीत होऊन तसे करीत नाही आहेत.



श्रील प्रभुपाद भारतात प्रचार करीत असताना अनेक सद्गृहस्थ त्यांच्याकडे येऊन आशीर्वाद मागत. श्रील प्रभुपाद सांगत की, अधिकांश लोक केवळ भौतिक लाभ प्राप्त करण्याकरिताच आशीर्वाद मागतात. माझ्या या अनुभूतीद्वारे मी लाखो-करोडो पुण्यवांन भारतीयांना मी काही कमी लेखत नाही, कारण श्रील प्रभुपाद नेहमी भारतीयांच्या सद्गुणांची स्तुती करीत असत. या अनुभूतीद्वारे मी केवळ हे सांगू इच्छित आहे की, श्रील प्रभुपादांचा उद्देश श्रीकृष्णांप्रति शुद्ध भक्तीचा प्रचार करण्याचा होता आणि त्यांनी लोकांची चेतना पुण्यकार्यांच्या स्तरावरून वर उठवित शुद्ध भक्तीच्या उच्च स्तरावर स्थापित केली.



श्री चैतन्य महाप्रभू आणि भगवान श्रीकृष्णांच्या परंपरेतील आचार्यांचे प्रतिनिधी असल्याकारणाने श्रील प्रभुपादांनी आम्हास शिकविले आहे की आपल्या जीवनाचा उपयोग एकमात्र कृष्णप्रेम विकसित करण्यासाठी केला पाहिजे. जेव्हा आपण आरतीच्या ज्योतीवरून हात फिरवितो तेव्हा हीच इच्छा करावी की आपल्या अंत:करणात श्रीकृष्णांविषयी प्रेम जागृत व्हावे. आपण अशी प्रार्थना देखील करू शकतो की, या ज्योतीद्वारे आपल्या अंत:करणातील अनर्थ भस्मसात व्हावेत. श्रील प्रभुपादांचे अनुयायी या व्यतिरीक्त इतर आशीर्वादांमध्ये रूची ठेवत नाही. आम्ही जाणतो की जीवात्म्याला कृष्णप्रेमाव्यतिरीक्त दुसरी कोणतीच गोष्ट आवश्यक नाही. एकमात्र हे कृष्णप्रेमच जीवात्म्याला पूर्ण आनंद आणि संतुष्टी प्रदान करू शकते. श्रीकृष्णांकडे आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करण्याची प्रार्थना करणे ही एकतर आध्यात्मिक अपरिपक्वतेचे चिह्न आहे किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव आहे.



मी एकेठिकाणी वाचले अथवा ऐकले होते की भगवंतांची कृपा ही पाच प्रकारे प्राप्त होते – साधुंद्वारे (शुद्ध भक्त), गुरूंद्वारे, शास्त्रांद्वारे, श्रीकृष्णांद्वारे आणि स्वत: आत्म्याद्वारे. याठिकाणी आत्म्याद्वारे कृपा प्राप्त करण्याचा अर्थ आहे आपण स्वत: आपल्यावरच कृपा करावी आणि इतर ठिकाणांहून प्राप्त कृपेचा लाभ घ्यावा.



श्रील प्रभुपादांकडे एखादा कृपायाचना करीत असे तेव्हा श्रील प्रभुपाद नेहमी सांगत की त्यांच्या निर्देशांच्या रूपात त्यांची कृपा नि:शुल्क उपलब्ध आहे. खरेतर, श्रील प्रभुपादांची कृपा श्रीकृष्णांच्या कृपेहून अभिन्न आहे. जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या शुद्ध प्रतिनिधीच्या मार्गदर्शनानुसार भक्ती करतो, हरिनामाचा जप करतो, तेव्हा साक्षात श्रीकृष्ण त्याठिकाणी उपस्थित असतात.



नागराज दास हे ‘जाऊ देवाचिया गावा’ मासिकाचे इंग्रजी संस्करण ‘बॅक टु गॉडहेड’ चे प्रमुख संपादक आहेत.

Spread the love

टेबल ऑफ़ कंटेंट्स

रिलेटेड आर्टिकल

Explore Other Articles

Scroll to Top